भटक्या
Powered By Blogger

Friday, March 26, 2010

विंदांचा "अलविदा"

             विंदा म्हणजे मराठी साहित्याच्या प्रांतातील अनेक Stalwarts पैकी एक. ज्ञानपीठ पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सहित अनेक पुरस्कारांचे मानकरी. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याचे फार मोठे नुकसान झाले आहेत. एक श्रेष्ट दर्जाचा कवी आणि तितक्याच उंचीचा माणुस अशी त्यांची ओळख मराठी जनमानसांत नेहमीच राहील. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जगाला काव्य देणारे आणि मृत्युनंतरही जगाला आपले पार्थिव देणार्‍या विंदांनी अखेरपर्यंत आपले 'देण्याचे व्रत' कायम ठेवले. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांच्याच कवितेत असे व्यक्त झालेले होते.


                          " देणार्‍याने देत जावे,

                            घेणार्‍याने घेत जावे.

                            घेता घेता एक दिवस..

                            देणार्‍याचे हात घ्यावे."


विंदांच्या जीवनातून इतका धडा आपण घेतला तरि पुष्कळ झाले......

No comments:

Post a Comment